आम्ही निसर्गाच्या समाधानाचे भाग आहोत....
आम्ही निसर्गाच्या समाधानाचे भाग आहोत...
होय आम्ही निसर्गाच्या समाधानाचे भाग आहोत ? हा प्रश्न मला खुप वेळा सतावुन सोडतो.....म्हणजे अस की आपण निसर्गाच्या समाधानाचे भाग आहोत हे समजण्याकरीता आपणाला इतकी वर्षे किंबहुना दशके गेली. त्यासाठी किती तरी जैविक संसाधनांचा फडशा पडला, बहुतेक जिव आपला गोतावळा सोडुन संपुष्टात आले. ब-याच जिवांना नामशेष व्हाव लागल अन आम्ही मात्र चित्र बघण्यातच खुष ! बर एखाद्या प्रजातीच मिळेलही संकलीत केलेल चित्र पण जि प्रजात आपल्याला माहितच न होता नष्ट झालीय तिच चित्र कस मिळवायच ? कारण आपल्याला माहित असलेल्या प्रजातीच्या प्रमाणापेक्षा माहित नसणा-या प्रजातींच्या संख्या जास्त आहे. असो तरी देखील आपण निसर्गाच्या समाधानाचे भाग आहोत, आपणाला जैविक संसाधानांना वाचविले पाहिजे, त्यांचे जतन, संरक्षण व संवर्धन केले पाहिजे, त्या जैविक संसाधनांचा शाश्वत वापर झाला पाहिजे, अन त्या संसाधनाचा व्यावसायिक वापर होत असेल तर त्याच्या लाभाचे न्यायी व समन्यायी वाटप झाले पाहिजे अस जैविक विविधता कायदा २००२ सांगतो.
आज हा सगळा उहापोह करण्याचे कारण म्हणजे जागतिक जैविक विविधता दिन जो दरवर्षी मे महिन्यातील २२ तारखेला साजरा केला जातो. हा दिवस साजरा करताना दरवर्षी काही एक मध्यवर्ती संकल्पना ठरली जाते अन त्यानुसार तो दिवस त्या संकल्पनेस अनुसरुन साजरा केला जातो. ह्यावर्षीची संकल्पना हि आशिच काही सर्वसमावेशक अशी आहे अन ती म्हणजे “आम्ही निसर्गाच्या समाधानाचे भाग आहोत” . ह्या संकल्पनाधारित हा दिवस साजरा करताना आपणास सध्याच्या कोविड १९ ची दखल देखील काळजीपुर्वक घेतली पाहिजे. ह्या जागतिक महामारी व टाळेबंदीमुळे आपणास पुन्हा एकदा निसर्गाचे महत्व आधोरेखीत झाल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे जैविक संसाधनाचे अस्तित्व देखील धोक्यात आल्याचे आपणास वेगवेगळ्या वर्तमानपत्रातील वन्यप्राणी अवयव तस्करीच्या, म्रुत्युच्या, जंगलातील मानवनिर्मित तसेच नैसर्गिक लागत असलेल्या वणव्यांच्या बातम्यांमुळे आपणास विचार करावयास पर्यायाने क्रुती करण्यास भाग पाडतात.
आज ह्या जैविक संसाधनाच्या वाढत्या वापरामुळे तसेच अंधश्रद्धा यामुळे चोरिचे तसेच शिकारीचे प्रमाण वाढते ह्यामुळे जिवांचे मोठ्या प्रमाणात बळी जात आहेत अन त्याप्रमाणात त्यांचे प्रजनन, पुनरुत्पादन देखील होताना दिसत नाही. जर एखाद्या जैविक संसाधनाचा व्यावसायीक वापर होत असेल किंवा त्याचे बाजारी मुल्य हे जास्त असेल तर पर्यायाने त्याची शिकार होणे किंवा चोरी होणे हे स्वाभाविक असते. या संसाधनाचा –हास होण्यास तसेच करण्यास आपणच म्हणजेच मानवच जबाबदार आहे कारण मानवाची मुलत: कोणतीही सहजपणे मिळणा-या गोष्टी वापरण्यापेक्षा त्या लुबाडण्यावरच त्याचे जास्त लक्ष आहे. पण याहुन देखील त्यांचे जतन होणे ही काळाची गरज आहे.
संकल्पनाधारीत कल्पना रंगवत असताना विचाराच्या गतीच्या निम्या गतीने का होईना ती संकल्पना सत्यात उतरवण्याकरीता प्रयत्न होणे हे गरजेचे आहे. अन त्याकरीता एकमेव क्रुती करणे हे महत्वाचे ठरणार आहे. तर मग चला निसर्गाच्या समाधानाचा भाग होऊया आपल्या जवळपासची नैसर्गीक संसाधने वाचवुया.......
- आपलाच वाघमोडे यांचा दौलतराजे, बनगरवाडी.